Friday, January 23, 2026

महाराष्ट्राची तिरडी बांधलीये!!

 मराठी भाषेची किंबहुना महाराष्ट्राची तिरडी बांधायला निघालेल्या भाजप अथवा समस्त दिल्लीश्वरांविरोधात जर लिहिले नाही..

जर आज ही आजूबाजूच्या सामाजिक, पारंपरिक परिस्थितिचे अवमूल्यन होताना पाहून सुद्धा आपली लेखणी चवताळली नाही...

अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा DNA असणाऱ्या माणसाला असं भरकटलेलं, आपल्याच मराठी संस्कृती विरुद्ध कारस्थाने करताना पाहून..

आपण शांत बसून दुर्लक्ष करून..समोर असलेला भाजप नावाचा राक्षस हा राक्षस नाही तर देवदूत आहे ह्या भ्रमात स्वतःला समजावत राहिलो...

तर आपल्या मायमराठी शी आपल्या आईच्या दुधातून मिळालेल्या भाषेशी केलेली ती गद्दारी ठरणार नाही का?

देशात असलेला 1 नंबर चा मराठी द्वेषी पक्षास महाराष्ट्रात अभय मिळावे या सारखे दुसरे दुर्दैव नाही..आणि त्यांची वकिली करण्यास सरसावत असलेले मराठी भैये जे त्या पक्षाच्या प्रेमात इतकं आकंठ बुडालेत की आपण आपल्या मातेसमान आईला आपल्या मराठी भूमीला सुद्धा उध्वस्त करणाऱ्यास हातभार लावतोय हे सुद्धा कळू नये?

का आपण तत्वांच्या आधारावर राजकीय पक्षाचे मूल्यांकन करत नाही?

हिंदुत्व सोडलं म्हणून गरळ ओकणारे भाजपीय अन जराही तमा न बाळगता अन सारासार विचार न करता भाजपचा ढोल बडवणारे अंधभक्त ह्यांच्या विषाचा सेनेवर फरक पडला नसता तरच नवल.

सेनेनं वेळोवेळी मराठी किंवा महाराष्ट्र राज्यास पूरक भूमिका घेतली आहे. अगदी बाळासाहेब असताना सुद्धा प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदा करिता सेनेनं बाळासाहेबांनी, काँग्रेस ला पाठिंबा दिलाय हा इतिहास आहे.

आणि भाजपचा ढोल बडवणाऱ्याना सुद्धा हे दिसू नये की धूर्त फडणवीसांनी ज्यांना भ्रष्ट म्हणून उर बडवून प्रचार केला त्यांच्याच साथीला बसून सत्तेचा मेवा खातायत..आता तुमचं हिंदुत्व कुठल्या शेपटीत घातलं? ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं त्यांनाच तुम्ही तुरुंगातून बाहेर काढून सत्तेत बसवलं..काहींना तर मुख्यमंत्री सुद्धा बनवलं. हे दिसुन ही ज्यांना कळत नाही तेच तर अंधभक्त आहेत ना?

आणि हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदीचेच अस्तित्व हाच भाजप चा डाव आहे..ह्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत मराठी भाषेला अथवा दक्षिणेतल्या कुठल्याच भाषेला स्थान नाही..हे माहीत असून सुद्धा हिंदुत्ववादाच्या खोट्या संकल्पनेत अडकून देशाचे कायमचे नुकसान करण्यास राजकीय पक्षापेक्षा त्यांचे अंधभक्तच जबाबदार असतील..

आणि मुख्य म्हणजे जेव्हा भाजपचा वरवंटा देशावर फिरेल तेव्हा सर्वांसकट अंधभक्त सुद्धा त्यात गाडले जातील..

भारतीय न्यायव्यवस्था नासडून, संविधान कोलमडून, देशाच्या स्वाययत्त संस्था हाताशी घेऊन, केंद्रीय सत्ता अन पैसा हाताशी घेऊन विरोधी पक्ष नेत्यांना त्रास देऊन कशी ही सत्ता ओरबाडून घ्यायची अन 

स्वतःला एक अकेला म्हणून वाह वाह करून घ्यायची.. स्वतःच स्वतःला चाणक्य म्हणनवुन घेण्यासारखं दुसर संकुचीत बुद्धिमान नाही!!

सत्तेचा अमरपट्टा डोक्याला लावून खालचं सगळं उघडं सोडून सगळीकडे नागडं फिरून लोकांना देशभक्तीचं तत्वज्ञान शिकवणारा दुसरा पक्ष ही नाही..

ज्या पाकिस्तानवर तेथील अल्पसंख्याक समाजावर अन्याय, धर्मांतर, अत्याचार करतात म्हणून टीकास्त्र सोडायच अन आपण ही इथे तसेच वागायचे. देशातील सारे उद्योगधंदे एकाच व्यापाऱ्याच्या हातात द्यायचे, भाषिक प्रांतरचना असून ही दिल्लीश्वरांची भाषा महाराष्ट्रवर लादणाऱ्या, आपल्याच भाषेची आपल्याच राज्याची तिरडी बांधणारा आपला मुख्यमंत्री अन त्याच्या साथीला असलेले परप्रांतीय खांदेकरी हे कमी होते का काय तर पुढे आपल्या राज्याची राख करून त्याचं मडकं पकडून आनंदाने स्मशानभूमीत नेत असलेला आपलाच मराठी माणूस !!


पुढील भाग लवकरच!!!

पंकज कानडे!!!

No comments:

Post a Comment