Saturday, October 22, 2016

...विठ्ठलाचा झेंडा...


     महाराष्ट्र, मराठा, मराठी हि एकाच स्वाभिमानी कर्तृत्वाची, इतिहासाची, एकीची तीन नावे आहेत.हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना, शिवरायांनी फक्त जातीने मराठा असलेल्यांना स्वराज्यात सामील केले नाही.तसे केले असते तर स्वराज्य स्थापनच झाले नसते.त्यांचा मराठा ह्या शब्दाचा अर्थ सर्व समावेशक होता.मराठा म्हणजेच महाराष्ट्रात राहणारा, मराठी भाषिक हिंदू.ती व्याख्या अजून मोठी अन व्यापक झाली जेव्हा आपला महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज मावळ्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढला.
      इतिहासात त्यागाची परिसीमा गाठून जात पात न बघता स्वराज्यासाठी लढणारे समाजाच्या सर्व स्तरातील, सर्व जातीचे मावळे लढले म्हणून स्वराज्य टिकले. नाहीतर आपल्या इथे आजकाल सर्व जातीचे एकमेकांना शिव्या घालतायत. स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या शूरवीरांना आज किती यातना होत असतील ह्याचा विचार करा.महाराष्ट्र एकसंध बांधण्यात आपली पुण्याई खर्च करणाऱ्या परमपूज्य बाळासाहेबांना आज स्वर्गलोकात किती यातना होत असतील याचा विचार करा..शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणवून आजचा मराठा क्रांतीत सामील होणारा समाज महाराष्ट्राच्या एकीला मोठी भगदाड पडणारा आहे.
     शिवसेना(बाळासाहेबांची) सर्व जातीस्तरातील मराठी समाजाला एकत्र करण्यात गेली ५० हुन अधिक वर्ष झटली. बाळासाहेबांनी दगडातून नेते निर्माण केले.आणि आज मराठा समाजातील लोकं स्वतः ला शिवसैनिक म्हणवणारे सेनेवर रुसून बसलेत.ह्यापुढे सेनेला मतदान करणार नाहीत असं काहीतरी फाजील बडबडतायत. आता जात मराठी, महाराष्ट्रापेक्षा मोठी झाली का?
     त्यांची भूमिका किती दुटप्पी आहे हे स्वतः पाहावे.सेनेच्या शाखेत प्रवेश करताना जात बाहेर ठेऊन येतो आपण.तीच बाळासाहेबांची शिकवण होती.साहेब जाऊन किती वर्षे झाली?आपण इतक्या सहज स्वार्थापायी ती मूल्य कशी विसरलोत?
      एक गोष्ट लक्षवेधी आहे..आजच्या मराठी मीडिया ने जाणूनबुजून ह्या आंदोलनाची बाजू उचलून धरलीये. सेनेविरुद्ध बोलताना लोकशाही,सर्वसमानतेचा  चा झेंडा फडकवणारे आज तो झेंडा कुठे घालून बसलेत?
एक कळकळणार मराठी.
पंकज कानडे.
#देखमराठासोचमराठा