स्वराज्य!!!
ऐतिहासिक बदलाची कुठलीही शक्यता दिसत नसताना बदल घडवून इतिहास निर्माण करण्याच्या इर्षेने ज्यांनी बलिदान केले ते अमर झाले. ..४०० वर्ष साधारण झाली असतील.त्यांनी इतक्या पुरातन काळात अख्ख राज्य वसवायचं जे स्वप्न पाहिलं त्याला कदाचित दैवी शक्तीच लागत असेल.
आजच्या टेक्नॉलॉजि च्या जगात आम्ही सर्व गोष्टी इतक्या पटापट करायला लागलोय..कि काल घडलेलं आज विसरून पुन्हा पूर्ववत जगायला मोकळे..पण काही गोष्टी विसरणं परवडणारं नसतं.
विटेवर विट बांधून अख्ख स्वराज्य उभं करायचं...त्याला किती कमालीचा संयम लागत असेल?? आपला एकुलता एक राहिलेला मुलगा, "उसनं फेडून या" असं म्हणत त्याच जल्लादाकडे पाठवायचा ज्याने आपल्या थोरल्या मुलाला दगाफटका करून मारला तेंव्हा त्या मातेला हृदय किती कठोर करावे लागले असेल??
किरकोळ लढाईत आपला भाऊ अन दिर एकाच वेळी गमवावा लागला त्या बहिणीला गृहिणीला काय वाटलं असेल? इतकं हृदय मजबूत केलं कसं तिने..
एक स्वप्न पाहायचं त्या प्रमाणे आपल्या मुलाला घडवायचं, सर्व संकटांपासून दूर ठेऊन त्याला मोठं करायचं अन मग स्वराज्याच्या स्थापनेच्या अग्निकुंडात अर्पण करायचं..देवानेच पाठवले असेल त्या वीर मातेला जिने जन्मभर फक्त त्याग केला..तिच्या त्याग इतका होता की त्यातून जे काही मिळालं ते पुढची ४०० वर्ष उपयोगी पडतंय..स्वराज्य.
होय स्वराज्य..कारण ते शून्यातून निर्माण झाले..आपल्या सह्याद्री च्या मावळ प्रांताच्या दऱ्या खोऱ्यातून मुलांना जमवायचं..त्यांना स्वत्व, स्वाभिमान , आपली ओळख निर्माण करण्याचा निर्धार निर्माण करणं तो तेवत ठेवणं..हे तेव्हा जेव्हा ना वाचायला साहित्य होते ना ओळख निर्माण करायला शिक्षण..अश्या काळात गरीब शोषित जनतेला उभं करून स्वराज्याचं शिलेदार बनवणं त्याला किती मेहनत लागली असेल?टिम-वर्क जे आपण म्हणतो ते हेच कि!!!
पोटात २ वेळचं जेवण जायची जेव्हा शाश्वती नव्हती तेव्हा हे केलं..इतकंच नव्हे तर त्या शूरवीरांनी बलिदानाच्या परिसीमा गाठल्या. काळ कुठला हि असो..जो मातीशी इमान राखतो, जो आपल्या लोकांशी इमान राखतो, त्यांचा विचार आधी करतो..त्याला आयुष्यात समाधान नक्कीच मिळेल..
पंकज कानडे
ऐतिहासिक बदलाची कुठलीही शक्यता दिसत नसताना बदल घडवून इतिहास निर्माण करण्याच्या इर्षेने ज्यांनी बलिदान केले ते अमर झाले. ..४०० वर्ष साधारण झाली असतील.त्यांनी इतक्या पुरातन काळात अख्ख राज्य वसवायचं जे स्वप्न पाहिलं त्याला कदाचित दैवी शक्तीच लागत असेल.
आजच्या टेक्नॉलॉजि च्या जगात आम्ही सर्व गोष्टी इतक्या पटापट करायला लागलोय..कि काल घडलेलं आज विसरून पुन्हा पूर्ववत जगायला मोकळे..पण काही गोष्टी विसरणं परवडणारं नसतं.
विटेवर विट बांधून अख्ख स्वराज्य उभं करायचं...त्याला किती कमालीचा संयम लागत असेल?? आपला एकुलता एक राहिलेला मुलगा, "उसनं फेडून या" असं म्हणत त्याच जल्लादाकडे पाठवायचा ज्याने आपल्या थोरल्या मुलाला दगाफटका करून मारला तेंव्हा त्या मातेला हृदय किती कठोर करावे लागले असेल??
किरकोळ लढाईत आपला भाऊ अन दिर एकाच वेळी गमवावा लागला त्या बहिणीला गृहिणीला काय वाटलं असेल? इतकं हृदय मजबूत केलं कसं तिने..
एक स्वप्न पाहायचं त्या प्रमाणे आपल्या मुलाला घडवायचं, सर्व संकटांपासून दूर ठेऊन त्याला मोठं करायचं अन मग स्वराज्याच्या स्थापनेच्या अग्निकुंडात अर्पण करायचं..देवानेच पाठवले असेल त्या वीर मातेला जिने जन्मभर फक्त त्याग केला..तिच्या त्याग इतका होता की त्यातून जे काही मिळालं ते पुढची ४०० वर्ष उपयोगी पडतंय..स्वराज्य.
होय स्वराज्य..कारण ते शून्यातून निर्माण झाले..आपल्या सह्याद्री च्या मावळ प्रांताच्या दऱ्या खोऱ्यातून मुलांना जमवायचं..त्यांना स्वत्व, स्वाभिमान , आपली ओळख निर्माण करण्याचा निर्धार निर्माण करणं तो तेवत ठेवणं..हे तेव्हा जेव्हा ना वाचायला साहित्य होते ना ओळख निर्माण करायला शिक्षण..अश्या काळात गरीब शोषित जनतेला उभं करून स्वराज्याचं शिलेदार बनवणं त्याला किती मेहनत लागली असेल?टिम-वर्क जे आपण म्हणतो ते हेच कि!!!
पोटात २ वेळचं जेवण जायची जेव्हा शाश्वती नव्हती तेव्हा हे केलं..इतकंच नव्हे तर त्या शूरवीरांनी बलिदानाच्या परिसीमा गाठल्या. काळ कुठला हि असो..जो मातीशी इमान राखतो, जो आपल्या लोकांशी इमान राखतो, त्यांचा विचार आधी करतो..त्याला आयुष्यात समाधान नक्कीच मिळेल..
पंकज कानडे