युगांत!! भाग-२.
मराठी अन इंग्रजी भाषेवर आमच्या घरच्यांनी मजनू सारखं प्रेम केलंय. त्या मुळे जेव्हा इंग्रजी भाषेतील पकडी साठी लोकं जेव्हा माझी स्तुती करतात तेव्हा प्रत्येक वेळी सांगावं लागतं.. अरे बाबांनो असे काही नाही. जे काही आहे ते तीर्थरूपांचे आहे. आमच्यात ज्या २-४ गोष्टी आल्यात त्या त्यांच्या पिढीकडून. आजी बोलता बोलता सहज एखादा अभंग किंवा एखाद्या कादंबरीतील संदर्भ इतक्या सहजतेने द्यायची की तिने ते स्वतः लिहिले असेल.
१९४२ ते १९९९ या कालखंडात आम्ही गिरगाव येथे वास्तव्यास होतो. कदाचित गिरगाव चा तो सुवर्णकाळाचा शेवट होता. आता तिथे जाऊसे ही वाटत नाही. मुंबईला आल्यावर आजोबा कामासाठी प्रयत्न करू लागले. आजोबा आधी घरभाडे जमा करायचं काम करायचे. शिक्षणाने वकील असलेले आजोबा या पेक्षा ही मोठं काम करणार होतेच. आणि मला जितके माहीत आहे, आजोबा भारत सरकार मध्ये मुंबई रेशनिंग कमिशन चे डेप्युटी कलेक्टर होते. पंजाब मध्ये हरित क्रांती झाली तेव्हा मुंबई साठी गहू आणायच्या कामात आजोबांनी सुद्धा मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या साठी लाल दिव्याची गाडी यायची त्यांना रोज न्यायला. या सर्व गोष्टींचा आजीने ना कधी माज केला , ना कधी स्वतःच्या मौजेसाठी हट्ट केला ना तशी इच्छा ठेवली.
१९४२ ते १९९९ या कालखंडात आम्ही गिरगाव येथे वास्तव्यास होतो. कदाचित गिरगाव चा तो सुवर्णकाळाचा शेवट होता. आता तिथे जाऊसे ही वाटत नाही. मुंबईला आल्यावर आजोबा कामासाठी प्रयत्न करू लागले. आजोबा आधी घरभाडे जमा करायचं काम करायचे. शिक्षणाने वकील असलेले आजोबा या पेक्षा ही मोठं काम करणार होतेच. आणि मला जितके माहीत आहे, आजोबा भारत सरकार मध्ये मुंबई रेशनिंग कमिशन चे डेप्युटी कलेक्टर होते. पंजाब मध्ये हरित क्रांती झाली तेव्हा मुंबई साठी गहू आणायच्या कामात आजोबांनी सुद्धा मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या साठी लाल दिव्याची गाडी यायची त्यांना रोज न्यायला. या सर्व गोष्टींचा आजीने ना कधी माज केला , ना कधी स्वतःच्या मौजेसाठी हट्ट केला ना तशी इच्छा ठेवली.
आजीने तिच्या धाकट्या धीराची , नंदेंची लग्न घरच्या थोरल्या स्त्री ने करावी तशीच केली. नंडेच बाळंतपण सुद्धा तिने केलं. याच प्रवासात आजीला ५ मुलं झाली. आमचे थोरले काका- सुहास (त्यांचा आजीच्या आयुष्यावर या पूढे किती प्रभाव पडेल अन त्या मुळे तिचे आयुष्य किती ढवळून निघेल याची तिला किंचितशी ही कल्पना नसेल), आमचे मधले काका- विलास (PWD मधून सेवा निवृत्त झाले) अन आमचे तीर्थरूप (इंग्रजी भाषा प्रेमाचे जीन्स आजोबांकडून डायरेक्ट घेणारे, ऑक्सफर्ड ची चालती फिरती डिक्शनरी, कविता करुन घरात त्याच्या चिटोऱ्या फेकून देणारे.. या शिवाय आमच्या तिर्थरूपांनी अशी ही एक ओळख आहे की ते पेशाने डॉक्टर आहेत) , आमच्या आत्या- शोभा अन प्रभा(जिला आम्ही चम्या अँटी म्हणायचो..तिचं व्यक्तिमत्व वेगळं, सर्व नाव काढतात, पप्पा सांगतात ती कोणालाच घाबरायची नाही..एकदम बिनधास्त..आजोबांची डेरिंग बहुतेक तिला जीन्स मधून मिळाली असेल..आज मायलेकी एकमेकांना भेटून, एकमेकांच्या मिठीत खूप रडल्या असतील हे नक्की!).
५ मुलांचं आयुष्य, बाकी घरच्यांची लग्न , आजोबांच्या बड्या ऑफिसातून येणाऱ्या लोकांचा पाहुणचार हे करत करत आजी त्यात इतकी गुरफटून गेली की तिच्या माहेरचं कोणी वारलं तरी ती कधी गेली नाही, जाऊ शकली नाही.. जवळ जवळ ५० वर्ष तिने माहेर पाहिलं नाही. तो विरह आमच्या तिर्थरूपांनी तोडला आणि ते आजीला रावढळ ला घेऊन गेले. आजी तिथे जाई पर्यंत बाकीसर्वांचे देहावसान झाले होते. तरी एक चमत्कार झाला. जवळ जवळ वयाच्या ८५ व्या वर्षी रावढळ ला गेली असता आजीला तिची बालमैत्रीण भेटली अन तिने आजीला ओळखले सुद्धा.
विरह सहन होत नाही माणसाला. आजीने विरह नुसता सहनच नाही केला तो पचवला सुद्धा. अन त्याचा कधी सुगावा ही कोणाला लागू दिला नाही. तिच्या विरहाचे दुःख किती खोल आहे हे गेल्या अडीच वर्षात मी रोज पाहिलंय. अप्पा, किसन, काशीनाथ या तिच्या थोरल्या भावांचीच नावे तिच्या तोंडी ऐकलीयेत मी. गेल्या जवळ जवळ ५०-६० वर्षांत जिने माहेरचं नाव सुद्धा काढलं नाही, तिथे गेली नाही.. तीच माझी जगन्माता आज एक दिवस जात नाही जेव्हा ती माहेरच्या व्यक्तींचं नाव घेत नाही. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा तिची स्मृती गेली तेव्हा ती फ्लॅश बँक मध्ये गेली. जवळच्या भूतकाळातील सारे सारे विसरली..अन ५०-६० वर्षांपूर्वीची तिची नाती पुन्हा नव्याने जन्माला आली. मी नेहमी पप्पांना विचारायचो अहो हिला माहेरी कधीच कसं जावसं वाटलं नाही? त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तिनेच तिच्या नकळत दिलं..तिच्या विरहाच्या जखमा इतके वर्ष ओल्याच होत्या, स्मृती गेल्याने अन आम्हाला कोणाला ओळखू न शकल्याने त्या बाहेर आल्या.
आमचे थोरले काका पार्किन्सन डिसीज ने ग्रासलेले. जगात कोणाला होत नसतील अश्या आजारांनी त्यांना ग्रासले. पार्किन्सन ने त्यांच्या मेंदूचा ताबा जो घेतला तो शेवटपर्यंत. कोणाला होत नाही, ऐकिवात नाही असा नारू रोग सुद्धा त्यांना झालेला. हे सर्व पाहून आजोबांनी त्यांचं लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आजीच्या मनावर पडलेला आणखीन एक घाला!! इथूनच आजीच्या त्यागाची, कमिटमेंट ची सुरुवात होते. आजीने ही सगळी आजारपणं हसत हसत काढली. स्वतःच्या मुलीच्या लग्नात काकांना डॉक्टरांकडे घेऊन गेलीये ती. हे सर्व होत होतं आमच्या गिरगाव च्या २२५ स्क्वेअर फुटाच्या खोलीत. १९४२ ते १९९९ !!! आजी गिरगाव जगली.
घर सांभाळता सांभाळता तिने वाचनाची आवड कधी सोडली नाही. कोण जाणे कदाचित त्यातून तिला काहीकाळ मुक्ती मिळत असेल? आजीचं वाचन इतकं होत की मुंबई मराठी ग्रंथालयाने आजीला आजीवन सभासद करून घेतले होते. ग्रंथालयातील सर्व पुस्तके वाचून झाली की हे सभासदपद मिळते!! आजोबांनी सुद्धा आजीच्या वाचनाला प्रोत्साहनच दिले. त्यांनी तर आजीला इंग्रजी भाषा सुद्धा शिकवायला सुरू केलेली. पप्पा सांगतात एकदा पाणी भरत असताना आजी अचानक पुटपुटली "Two fellows are coming". हे ऐकून मी मात्र उडालोच.
४ मुलांची लग्न झाली. सर्व आपल्या संसारात रमले. त्यांना सुद्धा मुलं झाली. आजीच मात्र आयुष्य अंगावर येणाऱ्या संकटांचे मैलाचे दगड व्हावेत असेच चालू होते. १९९५ साली आजोबा गेले. आमच्या तिर्थरूपांचा सर्वात मोठ्ठा आधार. आजी त्या दिवशी खूप शांत पणे झोपली!! आजोबा गेले अन त्याच्या काही दिवसांच्या अंतरातच आमची गिरगाव ची राहती इमारत आम्ही तिथे राहत असतानाच कोसळली!!!! इथूनच आजीच्या अन आमच्या आयुष्याची अजून एक सुरुवात झाली!!
त्या जगन्मातेस सलाम!!!🙏🙏🙏
पंकज कानडे!!
युगांत!! भाग-२ समाप्त.
पंकज कानडे!!
युगांत!! भाग-२ समाप्त.