पुनःश्च जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्राच्या मातीची हीच ताकद आहे इथे भले भले जगजेत्ते येऊन हरतात. तुम्ही नाकारा, हिणवा, विभाजन करा..महाराष्ट्राची माती आपली ताकद दाखवतेच..
ती एकच वज्रमुठ मारते ज्याने अखंड सिंहासन घळाघळ होते!! मोदी शहाच्या बदमाशी कारवायांना महाराष्ट्राने अवघ्या २ दिवसांत निकालात काढले.
अहंकार माणसाला रसातळाला घेऊन जातो..अहंकारी माणूस आपल्या कारवायांमध्ये आणि मी पणामध्ये इतका गुंतून जातो की त्याला स्वतःपुढे काहीच दिसत नाही.
मी शरद पवारांना संपावणार म्हणता म्हणता स्वतःच नष्ट झाला..अन जाता जाता स्वतःच स्वतःच नाक कापून अख्या जगासमोर शोभा केली.
इथे विशेष आभार मानायला हवे हे भक्तांचे. शिवसेना संपली. हिंदुत्व संपल अश्या वल्गना किती वेळ केल्या असतील. भाजपवाल्यांना शिवसेनेने असं पछाडलं की सेनेचं नाव घेतलं नाहीतर त्यांना कळ सुद्धा लागत नसेल. भाजप च्या कुरापती कारवायांनी ते सत्तेत क नकोत हे त्यांनीच सिद्ध करून दाखवले आहे. साजुक तूप वाल्यांचा अहंकार नडला हे आता महाराष्ट्रातलं शेंबड पोर सुद्धा सांगेल. पण हा पराभव नाहीये ही हार आहे..यात अनेकांनी आपली आपली भूमिका निभावली आहे.. स्वतःच्या मस्तीत गाढ झोपलेल्या भाजपला संजय राऊतांना जे कानाखाली रोज च्या रोज फटकारे मारलेत त्या धक्क्यातून सावरले नाहीत तर आश्चर्य वाटायला नको. त्या नंतर आत्मघातकी वाटेल इतकं उद्धव ठाकरेंनी केलेलं युती सोडून केलेलं धाडस ये भाजप वाल्याना स्वप्नात देखील त्रास देणार हे नक्की.
काँग्रेस चे वडेट्टीवार असतील वा राष्ट्रवादी चे नवाब मलिक..प्रत्येकांनी आपली बाजू लावून धरली..
शरद पवारांसारख्या राजकारणातील भीष्माचार्यनी भाजप रुपी संकटांना परतवून लावलं..उरली सुरली जी काही इज्जत शाबूत होती ती मिटवायची काळजी अजित पवारांनी घेतली.
भाजप हा धक्का कितपत पचवते..की वाऱ्यावर भरती झालेले वाऱ्यावर पुन्हा गलती होतील. आता भाजप मध्ये अंतर्गत भुकंप झाल्यास आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्र या ऍसिड टेस्ट मधून गेला हेच बरे झाले..अख्या देशाला एक कठोर संदेश गेला असेल. Shivsena has defeated the Invincibles!! शेवटी मराठ्यांची औलाद आहे.. विशेष आभार पश्चिम महाराष्ट्राचे. त्यांनी भरभरून भाजप विरोधात मतदान केले..त्यामुळे आज भाजपची खरी बाजू समोर आली..एक ही मारा लेकीन सॉलिड मारा!!!!
आज प्रबोधनकारांचे शब्द आठवतात..
हा महाराष्ट्र काही लेच्यापेच्यांचा देश नाहीये..ही वाघाची औलाद आहे वाघाची..
आणि जर या वाघाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याचे काय पडसद होतात याचे इतिहासात दाखले आहेत!!
पुनःश्च जय महाराष्ट्र!!!
पंकज कानडे
महाराष्ट्राच्या मातीची हीच ताकद आहे इथे भले भले जगजेत्ते येऊन हरतात. तुम्ही नाकारा, हिणवा, विभाजन करा..महाराष्ट्राची माती आपली ताकद दाखवतेच..
ती एकच वज्रमुठ मारते ज्याने अखंड सिंहासन घळाघळ होते!! मोदी शहाच्या बदमाशी कारवायांना महाराष्ट्राने अवघ्या २ दिवसांत निकालात काढले.
अहंकार माणसाला रसातळाला घेऊन जातो..अहंकारी माणूस आपल्या कारवायांमध्ये आणि मी पणामध्ये इतका गुंतून जातो की त्याला स्वतःपुढे काहीच दिसत नाही.
मी शरद पवारांना संपावणार म्हणता म्हणता स्वतःच नष्ट झाला..अन जाता जाता स्वतःच स्वतःच नाक कापून अख्या जगासमोर शोभा केली.
इथे विशेष आभार मानायला हवे हे भक्तांचे. शिवसेना संपली. हिंदुत्व संपल अश्या वल्गना किती वेळ केल्या असतील. भाजपवाल्यांना शिवसेनेने असं पछाडलं की सेनेचं नाव घेतलं नाहीतर त्यांना कळ सुद्धा लागत नसेल. भाजप च्या कुरापती कारवायांनी ते सत्तेत क नकोत हे त्यांनीच सिद्ध करून दाखवले आहे. साजुक तूप वाल्यांचा अहंकार नडला हे आता महाराष्ट्रातलं शेंबड पोर सुद्धा सांगेल. पण हा पराभव नाहीये ही हार आहे..यात अनेकांनी आपली आपली भूमिका निभावली आहे.. स्वतःच्या मस्तीत गाढ झोपलेल्या भाजपला संजय राऊतांना जे कानाखाली रोज च्या रोज फटकारे मारलेत त्या धक्क्यातून सावरले नाहीत तर आश्चर्य वाटायला नको. त्या नंतर आत्मघातकी वाटेल इतकं उद्धव ठाकरेंनी केलेलं युती सोडून केलेलं धाडस ये भाजप वाल्याना स्वप्नात देखील त्रास देणार हे नक्की.
काँग्रेस चे वडेट्टीवार असतील वा राष्ट्रवादी चे नवाब मलिक..प्रत्येकांनी आपली बाजू लावून धरली..
शरद पवारांसारख्या राजकारणातील भीष्माचार्यनी भाजप रुपी संकटांना परतवून लावलं..उरली सुरली जी काही इज्जत शाबूत होती ती मिटवायची काळजी अजित पवारांनी घेतली.
भाजप हा धक्का कितपत पचवते..की वाऱ्यावर भरती झालेले वाऱ्यावर पुन्हा गलती होतील. आता भाजप मध्ये अंतर्गत भुकंप झाल्यास आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्र या ऍसिड टेस्ट मधून गेला हेच बरे झाले..अख्या देशाला एक कठोर संदेश गेला असेल. Shivsena has defeated the Invincibles!! शेवटी मराठ्यांची औलाद आहे.. विशेष आभार पश्चिम महाराष्ट्राचे. त्यांनी भरभरून भाजप विरोधात मतदान केले..त्यामुळे आज भाजपची खरी बाजू समोर आली..एक ही मारा लेकीन सॉलिड मारा!!!!
आज प्रबोधनकारांचे शब्द आठवतात..
हा महाराष्ट्र काही लेच्यापेच्यांचा देश नाहीये..ही वाघाची औलाद आहे वाघाची..
आणि जर या वाघाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याचे काय पडसद होतात याचे इतिहासात दाखले आहेत!!
पुनःश्च जय महाराष्ट्र!!!
पंकज कानडे