कधी हा दहशदवाद्यांच्या गोळ्यांचा मार खातो,
ऊन पावसाचे हेलपाटे सहन करतो..
माझ्या राज्याचं रक्षण करणारा वर्दीतला माणूस
छोटयाशा चाळीत मध्यम वर्गीय म्हणून राहतो..
ह्याने केलेल्या कामाची किर्ती होते चोहीकडे
ह्याने गाळलेल्या घामाची चर्चा होते चोहीकडे
शहरं, राज्य पुन्हा वसवायला हे अधिरथ होतात ..
ह्याला विसरून आपली आयुष्य नेहमीप्रमाणे पूर्ववत होतात...
चिरीमिरी घेतात असे आपण बोल लावतो
वर्दीतले चोर म्हणून आपण त्याला हिणवतो
बाप, मुलगा, भाऊ अश्या अनेक भूमिका तोही निभावतो
वर्दीतला दर्दी आपण पाहायलाच अनेकदा विसरतो
निष्ठुर, निर्दयी असे आपल्या तोंडून सहजी निघत असेल..
पण मुलीला सासरी पाठवताना तो सुद्धा रडत असेल..
चिरीमिरी घेणार म्हणतो आपण
कधी विचार केला १०-१५ हजारात घर कसे चालत असेल??
सणासुदी ची सुट्टी असो वा क्रीडाविश्वाचे सामने असो..
ह्याच्या सुट्ट्याही वर्दी घालून त्यासोबत ड्युटीवर निघतात..
दिवसाचे २४ तास महिन्याचे ३१ दिवस ..
वेळ मिळालाच, तर डोक्याला धोंडा लावून निपचत पडलेले असतात..
रोज उठून युद्धावरच जणू जातात हे..
देवांची दारं बंद झाली तरी...
सुरक्षित वाटणाऱ्या शहरांचे
अधिरथ असतात हे
अधिरथ असतात हे
अधिरथ असतात हे
वर्दीतल्या दर्दी माणसाला माझा मानाचा मुजरा!!!
पंकज कानडे!!!
No comments:
Post a Comment