शिवसेनेवर मी जेव्हा टीकास्त्र सोडतो तेव्हा सेनाद्वेषी लोकं फार सुखावतात.गम्मत वाटते..असं वाटतं सेनेबद्दल वाईट लिहिलंय या भावनेने नं वाचताच लाईक ठोकत असतील. ह्यात आपले काही अती सुशिक्षित तरुण मराठी लोक हि आहेत ज्यांच्या तिर्थरूपांनाच कदाचित बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने नोकरी लागली असेल.आज हि मुलं कॉन्व्हेंट मध्ये जाऊन मोठी झाली म्हणून सेना कदाचित डाउन मार्केट वाटत असेल.
असो सोडा..मुद्दा तो नाहीये. ह्या आधीचा माझा लेख "शिवसेनेचे डेमॉनेटिझेशन" हा वायरल झाला व्हाट्सअप्प वर म्हणून खरं तर लिहितोय आज.
शिवसेनेवर टीका करताना अजिबात मजा येत नाही.आपल्या जवळची असलेली सेना आज काही चुकीच्या वक्तव्यामुळे हास्यास पात्र ठरते.वाईट वाटतं म्हणून लिहिलं जातं. आंधळ्या भक्तांना समजणार नाही..पण आपल्या सेनेत चुका होत असतील तर त्या वेळीच सावरून दुरुस्त केल्या पाहिजेत.त्यानं कडे दुर्लक्ष केले तर चलणार नाही.सेनद्वेषीना मी त्यांच्यातला वाटत असेन. आमचे रक्त भगवं आहे म्हणून किती ही टीका केली तरी आमचं मत नेहमी सेनेच्या पारड्यात पडणार. प्रार्थना एवढीच आहे सेनेने मात्र आम्हाला जबरदस्ती करू नये...कश्यासाठी??? त्यांना आम्ही मत देऊ नये यासाठी.
आपली शिवसेनेची ख्याती आहे ते लोकहितासाठी काम करण्याची..आपली सेनेची ख्याती आहे "करून दाखवलं" म्हणण्याची.आपली सेनेची ख्याती आहे..जे योग्य आहे तेच करण्याची..मग ते पोलिटिकल पंडितांच्या पुस्तकात न बसणारे असायचे बऱ्याचदा.बाळासाहेबांचं वैशिष्ट्य तेच होतं.. जे मनात आहे तेच ओठांवर..
आज ते होताना दिसत नाही..ममता बॅनर्जी सोबत जाऊन सरकार मध्ये मंत्रिपद उपभोगून सरकार ला विरोध करणं म्हणजे लाचारिपेक्षा हि भयानक आहे.आपापल्या मनाला विचारा..उत्तर मिळेल...बाळासाहेबांनी नोटबंदी ला पाठिंबच दिला असता.
सेनेने साधा विचार करायला हवा होता..भाजपच्या नेत्यांचे पैसे अडकले नसतील का?? अर्थाचे असतील पण ते मूग गिळून गप बसलेत.नोट बंदी झाली आणि शिवसेना नेत्यांनी बेताल वक्तव्य सुरु केली..त्यामुळे जे चित्र "इस हमाम में सब नंगे है" असं असायला हवे होते ते आता विनाकारण सेनेकडे खूप काळा पैसा आहे असे आहे.अर्थात ते सुद्धा सत्यच. पण मस्ती अख्या वर्गाने करावी आणि मार एकाने खावा असं झालं.
दस्तुरखुद्द पवार साहेब म्हणजे करप्शन चे महागुरू सुद्धा गप बसले..सेना वाल्यानी "लोकांना गैरसोय होतेय" ह्या बहाण्याखाली जे सरकारच्या कामात अडथळे निर्माण केले त्याऐवजी सरकार सोबत राहिले असते तर त्याचा फायदा महापालिकेला झाला असता.आज साहेब नाहीत म्हणून काही उनाड टाळकी सेना चालवायला बघतायत.
कट्टर सैनिकांना एकच विनंती सेना वाढवायची असेल तर सेनेच्या असल्या फाजील गोष्टींना लाथ मारा.सेना अजूनही साहेबांची आहे..आणि साहेबांनी सेना अशी मुळीच चालवली नसती.
#एकमराठीलाखमराठी
कट्टर शिवसैनिक
पंकज कानडे..
जय महाराष्ट्र!!
असो सोडा..मुद्दा तो नाहीये. ह्या आधीचा माझा लेख "शिवसेनेचे डेमॉनेटिझेशन" हा वायरल झाला व्हाट्सअप्प वर म्हणून खरं तर लिहितोय आज.
शिवसेनेवर टीका करताना अजिबात मजा येत नाही.आपल्या जवळची असलेली सेना आज काही चुकीच्या वक्तव्यामुळे हास्यास पात्र ठरते.वाईट वाटतं म्हणून लिहिलं जातं. आंधळ्या भक्तांना समजणार नाही..पण आपल्या सेनेत चुका होत असतील तर त्या वेळीच सावरून दुरुस्त केल्या पाहिजेत.त्यानं कडे दुर्लक्ष केले तर चलणार नाही.सेनद्वेषीना मी त्यांच्यातला वाटत असेन. आमचे रक्त भगवं आहे म्हणून किती ही टीका केली तरी आमचं मत नेहमी सेनेच्या पारड्यात पडणार. प्रार्थना एवढीच आहे सेनेने मात्र आम्हाला जबरदस्ती करू नये...कश्यासाठी??? त्यांना आम्ही मत देऊ नये यासाठी.
आपली शिवसेनेची ख्याती आहे ते लोकहितासाठी काम करण्याची..आपली सेनेची ख्याती आहे "करून दाखवलं" म्हणण्याची.आपली सेनेची ख्याती आहे..जे योग्य आहे तेच करण्याची..मग ते पोलिटिकल पंडितांच्या पुस्तकात न बसणारे असायचे बऱ्याचदा.बाळासाहेबांचं वैशिष्ट्य तेच होतं.. जे मनात आहे तेच ओठांवर..
आज ते होताना दिसत नाही..ममता बॅनर्जी सोबत जाऊन सरकार मध्ये मंत्रिपद उपभोगून सरकार ला विरोध करणं म्हणजे लाचारिपेक्षा हि भयानक आहे.आपापल्या मनाला विचारा..उत्तर मिळेल...बाळासाहेबांनी नोटबंदी ला पाठिंबच दिला असता.
सेनेने साधा विचार करायला हवा होता..भाजपच्या नेत्यांचे पैसे अडकले नसतील का?? अर्थाचे असतील पण ते मूग गिळून गप बसलेत.नोट बंदी झाली आणि शिवसेना नेत्यांनी बेताल वक्तव्य सुरु केली..त्यामुळे जे चित्र "इस हमाम में सब नंगे है" असं असायला हवे होते ते आता विनाकारण सेनेकडे खूप काळा पैसा आहे असे आहे.अर्थात ते सुद्धा सत्यच. पण मस्ती अख्या वर्गाने करावी आणि मार एकाने खावा असं झालं.
दस्तुरखुद्द पवार साहेब म्हणजे करप्शन चे महागुरू सुद्धा गप बसले..सेना वाल्यानी "लोकांना गैरसोय होतेय" ह्या बहाण्याखाली जे सरकारच्या कामात अडथळे निर्माण केले त्याऐवजी सरकार सोबत राहिले असते तर त्याचा फायदा महापालिकेला झाला असता.आज साहेब नाहीत म्हणून काही उनाड टाळकी सेना चालवायला बघतायत.
कट्टर सैनिकांना एकच विनंती सेना वाढवायची असेल तर सेनेच्या असल्या फाजील गोष्टींना लाथ मारा.सेना अजूनही साहेबांची आहे..आणि साहेबांनी सेना अशी मुळीच चालवली नसती.
#एकमराठीलाखमराठी
कट्टर शिवसैनिक
पंकज कानडे..
जय महाराष्ट्र!!
No comments:
Post a Comment